![]() |
पंडित भीमसेन जोशी |
पंडित भीमसेन हे लोकप्रिय हिंदुस्थानी शास्रीय गायक आहेत .
संगीत शिक्षण -
पंडितजींचे वडिल व्यवसायाने शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नसे आणि भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर , लखनौ ,रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ. स १९३3 साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ग्वाल्हेरात दाखल झाले त्यानंतर त्यांनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खौ, वझेबुवा, केसरबाई केरकर ,उस्ताद अब्दुल करीम खौ , वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले.सुरूवातीला ते इनायत खौ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जलंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे,ग्वाल्हेर येथे राजाभय्या यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. रामपूर येथे मुस्ताक हुसेन खौ यांच्याकडे काही काळ शिकले. अशाप्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनऊ, रामपूर येथे व्यतित केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या त्यांच्या वडिलांशी भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडिल भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ जे ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घरानाच्या पद्धतीचे गायक होते. त्याकाळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरूगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी ,पुरिया ,मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ .स १९३६ ते इ .स १९४१ पर्यंतच्या काळात शक्यतेवढे ज्ञान आत्मसात केले. रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा ते स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि पुणे येथे आले.
.
कारकीर्द-
भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफल इ .स १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांनी कानडी आणि हिंदी भाषेतील काही उपशास्त्रीय गीते गाऊन पहिले ध्व्नीमुद्रण केले आणि पुढील काही वर्षांमध्ये त्यांनी शास्त्रीय गाण्यांचे पहिले ध्वनीमुद्रण केले.सवाई गंधर्वाच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमीत्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीतील व्यस्तता वाढली. त्याकाळात त्यांना पु .ल .देशपांडे यांनी गंमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कारण त्यांना वारंवार करावा लागणारा विमान प्रवास. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरातील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमान प्रवास करीत .
पंडितजींना आधुनिक हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे किंवा ख्याल गायक म्हणतात. परंतू १९४० च्या दशकात त्यांनी लखनौ मध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम ठुमारू गायकांकडून ती शिकून घेतली. आज ते दोन्ही पद्धतीने लीलया गातात. असे म्हणतात की ख्याल गायकीपेक्षा ठुमरी गायन अधिक कठिण आहे. अभंगगायन हा तर पंडितजींचा हातखंडा विषय! 'संतवाणी' या नांवाने पंडितजींनी अ़क्षरश: हजारो कार्यक्रम केले.
मराठी अभंग-
मराठीतील त्यांनी गायलेले अभंग अतिशय लोकप्रिय झाले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे :
- अगा वैकुंठीच्या राया
- आता कोठे धावे मन
- अधिक देखणे तरी
- अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा
- आरंभी वंदिन, अयोध्येचा राजा
- ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव
- इंद्रायणी काठी
- कान्होबा, तुझी घोंगडी चांगली
- काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल
- मन, रामरंगी रंगले
- माझे माहेर पंढरी
- नामाचा गजर, गर्जे भीमातीर
- पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान
- रूप पाहता लोचनी
- तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल
- पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
No comments:
Post a Comment